असो, शेवटी सरकारनं मान्य केलंच नोकऱ्यांचं संकट – काँग्रेस
Max Maharashtra | 17 Jun 2019 3:33 PM GMT
X
X
नोकऱ्यांमध्ये महिलांचं कमी होणारं प्रमाण अखेर केंद्र सरकारनं मान्य केल्याचं ट्विट काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलंय. या ट्विटमध्ये काँग्रेसनं नुसती टीका केली नसून महिलांना पुन्हा नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करून घेण्याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचा सल्लाही काँग्रेसनं दिलाय.
देशाच्या एकूण मनुष्यबळामध्ये महिलांचं प्रमाण कमी झालंय. २०११-२०१२ मध्ये महिलांचं नोकऱ्यांमधील प्रमाण हे ३१ टक्के होतं. ते कमी होऊन २२ टक्के झालंय. शहरी भागातील महिलांच्या बेरोजगारीचं प्रमाण हे २०११ – २०१२ मध्ये ५.२ टक्के होतं ते २०१७-१८ मध्ये वाढून १०.८ टक्के झाल्याचं काँग्रेसनं ट्विटमध्ये म्हटलंय.
Updated : 17 Jun 2019 3:33 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire