जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत कोसळून २ विद्यार्थ्यांचा मृत्यू
Max Maharashtra | 28 Aug 2017 3:07 PM GMT
X
X
अहमदनगर जिल्हयातील निंबोडी इथं जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत कोसळून २ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून ३५ विद्यार्थ्यी जखमी झाले आहेत तर त्यातील 5 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहेत. श्रेयस रहाणे आणि वैशाली पोटे अशी दोन्ही मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
विशेष बाब म्हणजे अहमदनगर शहरापासून हे गाव अवघे १० किमी अंतरावर आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयापासून १० किमी अंतरावर असणा-या गावातील शाळेची ही अवस्था आहे तर जिल्ह्यातील इतर शाळेची काय अवस्था असेल.
Updated : 28 Aug 2017 3:07 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire