संघटनेसाठी सदाभाऊंची जोरदार मोर्चेबांधणी
Max Maharashtra | 16 Sep 2017 10:00 AM GMT
X
X
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून वेगळे झालेले राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नवीन संघटना स्थापन करण्याची घोषणा मुंबईत नुकतीच केली होती. नवीन संघटना स्थापन करण्यासाठी एक मसुदा समिती स्थापन केली आहे, या समितीची गेली २ दिवसांपासून कोल्हापुरात बैठक सुरू आहे
या बैठकीत नवीन संघटनेचे नाव,झेंडा, बिल्ला, संहिता, नियमावली इत्यादी बाबींवर चर्चा सुरू आहे. संघटनेची स्थापना २१ सप्टेंबरला कोल्हापूरमधील शाहू स्मारकात होणार आहे. तर संघटनेचा पहिला दसरा शेतकरी मेळावा ३० सप्टेंबरला इचलकरंजीत होईल.
Updated : 16 Sep 2017 10:00 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire