Home > News Update > India China Border: भारताचे 20 जवान शहीद, दिल्लीत हालचालीला वेग

India China Border: भारताचे 20 जवान शहीद, दिल्लीत हालचालीला वेग

India China Border: भारताचे 20 जवान शहीद, दिल्लीत हालचालीला वेग
X

लडाखमधील गलवान खोऱ्यात (Galvan Valley) भारत आणि चीन यांच्यात झालेल्या बाचाबाचीत एक अधिकारी आणि दोन भारतीय जवान शहीद (Army officer and two Army jawans) झाले असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, नव्यानं हाती आलेल्या वृत्तानुसार 10 जवान शहीद झाले आहेत. या संदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेनं ट्विट केलं आहे. तर ANI या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार 20 जवान शहीद झाले आहेत.

At least 20 Indian soldiers killed in the violent face-off with China in Galwan valley in Eastern Ladakh. Casualty numbers could rise: Government Sources pic.twitter.com/PxePv8zGz4

— ANI (@ANI) June 16, 2020

या संदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या प्रतिक्रियेत भारत आपल्या हद्दीत कोणताही निर्णय घेण्यास आणि राबवण्यास स्वतंत्र आहे, चीनने याचे भान ठेवावे आणि हद्दीचे उल्लंघन टाळावे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

या सर्व घडामोडीनंतर देशाची राजधानी दिल्लीत मोठ्या हालचालीला सुरुवात झाली आहे. संरक्षणाशी संबंधित मुद्यांवर चर्चेसाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले.

दरम्यान हे वृत्त आल्यानंतर आज दिवसभर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठका सुरु आहेत. या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर तसेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (Chief of Defence Staff Bipin Rawat), लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (Army chief General Manoj Mukund Naravane), नौदलप्रमुख अॅडमिरल करमबिरसिंह (Navy chief Admiral Karambir Singh) आणि हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदुरिया (Air chief marshal Rakesh Kumar Singh Bhadauria) उपस्थित होते.

गलवान खोऱ्यात काय घडतंय?

गलवान खोऱ्याच्या सीमेवर चीनी सैन्याने टेंट उभारले आहेत. त्यामुळे भारतीय लष्करानं या ठिकाणी सैन्य दल वाढवले आहे. असं भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. भारताकडूनच गलवान खोऱ्यात बेकायदा हालचाली सुरू असल्याचा दावा चीननं केला आहे.

गलवान खोऱ्याचे महत्त्व काय?

गलवान खोऱ्याचा परिसर पाकिस्तान, चीनच्या शिनजियांग प्रांताला तसंच लडाखच्या सीमेला लागून आहे. 1962 च्या युद्धातही गलवान खोरे युद्धाचे प्रमुख केंद्र होता. त्यामुळं या भागाचं महत्त्व अधिक आहे. गलवान खोरे लडाख आणि अक्साई चीनच्या मधोमध भारत-चीन सीमेच्या जवळ आहे. अक्साई चीनवर भारत आणि चीन दोघंही आत्तापर्यंत दावा करत आलेले आहेत.

1975 नंतर पहिल्यांदाचं घडली अशी घटना... काय घडलं होतं 1975 ला?

1975 ला सीमेवर झालेल्या एका चकमकीत 4 जवान शहीद झाले होते. चीनने भारतात घुसखोरी करुन गोळीबार केला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला तरी एकमेकांवर गोळीबार करुन शस्त्रसंधीचे उल्लंघन करायचे नाही. असं ठरवण्यात आले. त्यानंतर आज हाती आलेल्या वृत्तानुसार 1975 नंतर सर्वाधिक जवान शहीद झाले आहेत. ४५ वर्षांच्या इतिहासात चिनी सीमेवर इतकी मोठी घटना घडली आहे.

Updated : 16 Jun 2020 4:51 PM GMT
Next Story
Share it
Top