'प्रज्ञासिंग' आपल्यासाठी कायदे बनविण्याकरीता संसदेत जाण्याच्या तयारीत आहेत !
Max Maharashtra | 20 April 2019 4:45 AM GMT
X
X
26 /11 ची सायंकाळ.कंट्रोल रुम चा मेसेज मिळाला ."सर्व अधिकाऱ्यांनी ताबडतोब आपापल्या हद्दीत रवाना व्हावे असा पोलीस आयुक्तांचा आदेश आहे" मी युनिफॉर्म चढवून उत्तरेकडे निघालो . खालच्या फ्लॅटमध्ये राहणारे करकरे दक्षिणेकडे गेले....
पुढचा इतिहास जगाला ठावं आहे!
मालेगाव बॉम्ब स्फोटात प्रज्ञासिंग व साथीदारांचा सहभाग सिद्ध करणाऱ्या शहीद करकरे बद्दलचे प्रज्ञासिंगचे उद्गार ऐकून सारा देश गार झाला !
करकरे वहिनी जग सोडून गेल्या. देशा साठी बलिदान देणाऱ्या करकरेंची दोन्ही मुलं हा देश सोडून गेली. आणि देशप्रेमाचा घाऊक मक्ता घेतलेल्या भाजप तर्फे प्रज्ञासिंग आपल्यासाठी कायदे बनविण्याकरीता संसदेत जाण्याच्या तयारीत आहेत !
बॉम्ब स्फोट घडविणाऱ्यांना अटक करणे हे करकरेंचं कृत्य राष्ट्र द्रोह व धर्म विरोधी कृत्य आहे असे साध्वीने जाहीर केले .
11 ऑक्टोबर 2016 साली नागपूर येथे RSS दसरा मेळाव्यात देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, मोहन भागवत व इतर असंख्य यांनी जाहीर निर्धार केलेला आहे की " कुरुक्षेत्रमे फिरसे होगा असूर शक्तीका विनाश। मनमें पूर्ण विश्वास।"
जे RSS च्या विरोधी विचार मांडतात व जे घटनेप्रमाणे कारवाई करतात ते असूर होत व त्यांचा नाश करणे हे RSS / हिंदुत्ववाद्यांचे ध्येय आहे. म्हणूनच प्रज्ञासिंग ने असे वक्तव्य केले आहे .
IPS असोशियनने याचा निषेध केलाय. गृहखाते हाताळणारे कट्टर RSS वादी फडणवीस काय करतायत ते बघता येईल .
लोकशाही मार्गाने ही विषवल्ली येत्या निवडणुकीत समूळ नष्ट करता येईल ! हे मात्र आपल्या कक्षेत आहे !
-सुरेश खोपडे
Updated : 20 April 2019 4:45 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire