अहमदनगर : ‘ना’ 'त्या' चं राजकारण
X
अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला पाठिंबा दिला आणि राज्यात आगामी काळात सत्तेची गणितं बदलणार का? याची चर्चा सुरू झाली. मात्र, मला असं वाटतं या चर्चे अगोदर आपण या जिल्ह्याचं राजकारण समजून घ्यायला हवं.किंवा हे पहिल्यांदाच घडतंय का? हे पण जाणून घ्यायला हवं.
अहमदनगर जिल्हा म्हणजे काना, मात्रा, वेलांटी, उकार नसलेला जिल्हा. मात्र, या जिल्ह्याचे राजकारण नावाप्रमाणे इतकं साधं नाही. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा जिल्हा एकेकाळी कम्युनिष्टांचा गड समजला जायचा. आता हा जिल्हा सहकाराची पंढरी म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याने महाराष्ट्राला सहकार दिला आणि याच सहकाराला जोडून आलेलं राजकारण देखील. अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे आणि थोरात घराण्याचं मोठं नावं आहे. या दोन घराण्याबरोबरच काळे, कोल्हे, राजळे, गडाख, तनपुरे, घुले, पाचपुते असे साखर सम्राट असलेले राजकारणी आहेत. मात्र, या साखर सम्राटातील बहुतेक घराणे विखे अथवा थोरात गटाशी विभागले गेलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे राजकारण या दोन्ही घराण्याभोवती फिरत असते. अहमदनगरच्या राजकारणात पक्ष कधीच महत्वाचा नव्हता. नात्याचे राजकारण आणि पाडापाडीचे राजकारण हे या जिल्ह्यातील राजकारणाचं वैशिष्ट.
शालिनी विखे, अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष
नुकत्याच पार पडलेल्या अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला पाठींबा दिल्यानं राज्यात आगामी काळात सत्तेची गणितं बदलतील अशी चर्चा सुरु आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात अशी अभद्र युती होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २००७ साली राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या. यावेळी विखे गटाला अडीच वर्षे अध्यक्ष पद आणि विखे गटानंतर थोरात गटाला अडीच वर्षे अध्यक्ष पद असा फॉर्म्युला ठरला. मात्र, अडीच वर्षानंतर विखे गटाने थोरात गटाला अध्यक्ष पद दिलं नाही.त्यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे उमेदवार सध्याचे युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे होते. पक्षाने तांबे यांना मतदान करण्यासाठी कॉंग्रेस जिल्हा परिषद सदस्यांना व्हीप देखील बजावला होता.
राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, सत्यजीत तांबे
भानुदास कोतकर आमदार कर्डीले यांचे व्याही
माजी आमदार अनिल राठोड आणि आमदार संंग्राम जगताप
जायज़ होती है हर बात सियासत में