भयावह अराजकाचे सावट
X
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग हे बलात्काराच्या केसमध्ये दोषी असल्याचे हायकोर्टाने म्हटले आणि हिंसेचा उद्रेक झाला. हरयाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, हिमाचल प्रदेश , उत्तर प्रदेश या राज्यात हिंसेचा आगडोंब उसळला. आतापर्यंत हाती आलेल्या बातमीनुसार सुमारे ३० मृत्यू झाले आहेत २५० जखमी झाले आहेत आणि १०००हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. शेकडो बसेस जाळण्यात आल्या आहेत. ट्रेन्स पेटवल्या आहेत. सैन्यावर हल्ला करण्यात आला आहे. मीडियाच्या ओबी व्हॅनवर देखील मारा करण्यात आला आहे.एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवताच इतका मोठा हिंसाचार का झाला ?
हरयाणामध्ये या आधीही जाट आंदोलनाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर हिंसा घडली. मुख्यमंत्री खट्टर हे आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरले. नुकतंच उत्तर प्रदेशमधील गोरखपूर इथे ७१ मुलांचा बळी गेला ऑक्सिजन न मिळाल्याने. यावर तेथील आरोग्यमंत्री म्हणाले- ऑगस्टमध्ये लहान मुलां