सध्या कशी आहे लातूरची हवा?
X
#जोशींचीतासिका
वारे बीड जिल्ह्याचे या लेखास स
विजयकुमार स्वामींनी चर्चेला सुरुवात करताना भारतातील लोकसभा मतदारसंघांची रचना किती मजेशीर आहे याचे उदाहरण दिले. लातूरपासून २० किलोमीटरवर असलेले औसा हे लोकसभेसाठी उस्मानाबाद जिल्ह्याशी संलग्न आहे, तर शंभर किलोमीटरवरील नांदेड जिल्ह्यातील लोहा लातूर जिल्ह्यांशी संलग्न आहे. अर्थात आज आपण भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचाच विचार करणार आहोत. त्यामुळे लोहा मतदार संघाविषयी या लेखात माहिती नसेल.
१. लातूर शहर मतदारसंघात देशमु
१९८० सालापासून १९९५ चा अपवाद व
आकडेवारीचा विचार करता २००९ सा
लिंगायत, मारवाडी आणि मुस्लिम हे तीन समाज इथे सर्व राजकीय समीकरणे घडवू किंवा बिघडवू शकतात. लातूरमध्ये शिवसेनेचे काम चां
स्था
अमित देशमुखांचा पराभव स्वतः ते
२. काट्याची टक्कर असेल लातूर ग्रामीणमध्ये
लातूर ग्रामीण मतदारसंघात विद्
गोपीनाथराव मुंडे यांनी आधी अने
३. अनेक इच्छुकांचा औसा
लोकसभेसाठी उस्मानाबाद जिल्ह्याशी संलग्न असलेले लातूरपासून जेमतेम २० किलोमीटरवर असलेल्या लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघात विलक्षण राजकीय वारे वाहत आहेत. सलग दोनदा आमदार झालेले बसवराज पाटील हेच बहुधा काँग्रेसचे भावी उमेदवार असतील. पण संभ्रमित काँग्रेस ऐनवेळी काय करेल हे सांगता येत नाही. त्यांना दोन्ही वेळेस टक्कर देणारे दिनकर मानेंना शिवसेना तिकीट देईल की नाही सांगता येत नाही. शिवसेनेकडून अजून एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे संतोष सोमवंशी.
राष्ट्रवादीची नगरपालिका असलेल्या औसा भागात राष्ट्रवादी काँग्रेस कमजोर आहे. भाजपकडून पाशा पटेल इच्छूक असले तरी त्यांना मोठ्या प्रमाणावर पक्षांतर्गत विरोध आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांचे भाऊ अरविंद पाटील हे देखील भाजपचे संभाव्य उमेदवार असू शकतात. काहींच्या मते दिनकर माने भाजकडूनही यंदा उभे राहू शकतात. थोडक्यात औसा मतदार संघात हौश्या-नवश्या-गवश्या अशा अनेक इच्छूकांनी आतापासूनच कंबर कसली आहे.
४. निलंग्यात असेल परंपरागत कौटुंबिक संघर्ष
१९९९ पासून या मतदारसंघातील नागरिकांनी आळीपाळीने काका-पुतण्यांना विजयी केले आहे. १९९९ साली शिवाजीराव पाटील आमदार झाले. त्यांनतर २००४ मध्ये संभाजी पाटील विधानसभेत गेले. पुढे २००९ साली पुन्हा शिवाजीराव आमदार झाले तर गेल्यावेळी म्हणजे २०१४ मध्ये पुन्हा संभाजी पाटील आमदार झाले. यंदाही काँग्रेसकडून सध्यातरी शिवाजीरावांनाच पसंती असेल तर भाजपकडून मंत्री असलेले संभाजी पाटील ह्यांनाच तिकीट मिळेल असे वातावरण आजमितीला आहे. इथे तिसरा पर्याय समोर येण्याची शक्यता धूसर आहे. थोडक्यात निलंग्यात परंपरागत कौटुंबिक संघर्षच असेल असे चित्र सध्यातरी आहे.
मात्र, यंदा संभाजी पाटलांचे पारडे जड असेल कारण राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. तसेच संभाजी पाटील निलंगेकरांनी कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभारलेली आहे. पण, मूड बदलाचे पाईक असलेले औसेकर काहीही करू शकतात त्यामुळे मुरब्बी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याही अपेक्षा आजही पल्लवित आहेत.
५. धर्मगुरूंच्या मतावर अवलंबून असलेले अहमदपूर
लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या अहमदपूरमध्ये लिंगायत समाजाचे प्रमुख धर्मगुरू ज्याला विजयाचा आशीर्वाद देतील तीच व्यक्ती आजवर विजयी होत आली आहे. १९९९ साली आमदार झालेले विनायकराव जाधव-पाटील हे २०१४ साली अपक्ष (भाजप सहयोगी) म्हणून निवडून आले होते. इथे शिवसेनेचे म्हणावे असे काम नाही. राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नावाचा विचार अहमदपूर मतदार संघात करू शकते. जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आगामी निवडणुकीत आघाडी झाली तर शरद पवार अहमदपूरची जागा राष्ट्रवादीकडे मागून घेतील. भाजप यंदाही विनायकराव जाधव यांनाच सहकार्य करेल असे इथल्या स्थानिकांचे सध्याचे मत आहे. १९९० साली काँग्रेसचे बाळासाहेब जाधव हे आमदार झाले होते. त्यानंतर इथे आजवर काँग्रेसला यश मिळालेले नाही. एकेकाळी या मतदारसंघावर चांगलीच पकड असलेल्या शेतकरी कामगार पक्षाची ताकद इथे जवळपास नामशेष झाली आहे.
६. बहुरंगी उदगीर
उदगीर हा मतदारसंघ राखीव आहे. इथे बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघाप्रमाणे काही विशिष्ट घराणे महत्त्वाची भूमिका बजावतील. भाजपकडून विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांनाच पसंती असेल असे स्थानिकांचे म्हणणे आहे. १९६२ सालापासूनच इतिहास बघता १९७८, १९८० आणि १९८५ साली काँग्रेसचे बाळासाहेब जाधव सलग तीन वेळेस विजयी झाले होते. जाधव वगळता आजवर कोणालाही ही करामत इथे करता आलेली नाही. जाधव यांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची भालेराव यांना यंदा नामी संधी आहे. त्यांना आव्हान असेल ते काँग्रेसच्या उषा कांबळे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे यांचे. मागच्या वर्षी झालेल्या उदगीर नगर परिषद निवडणुकीत भाजपला १६ तर काँग्रेसला १३ जागा मिळाल्या होत्या. त्याचवेळी एमआयएमचे सहा नगरसेवक निवडून आले होते. तेव्हा जर एमआयएमने इथे उमेदवार दिला आणि मुस्लिम मते एकगठ्ठा त्या उमेदवाराला पडली तर तो उमेदवार जिंकेल की नाही हे सांगणे अवघड आहे. पण तोच उमेदवार अनेकांचा स्वप्नभंग करू शकतो.
लवकरच भेटू पुढच्या भागात, तेव्हा तपासू परभणी किंवा नांदेड जिल्ह्यातले राजकीय तपमान.
अनिरुद्ध जोशी, परळी वैजनाथ
चलभाष क्रमांक : 8983555657