Home > मॅक्स ब्लॉग्ज > काय आपण पुढील अडीच महिने चॅनेल पाहणं बंद करु शकता का? बंद करा - रवीश कुमार

काय आपण पुढील अडीच महिने चॅनेल पाहणं बंद करु शकता का? बंद करा - रवीश कुमार

काय आपण पुढील अडीच महिने चॅनेल पाहणं बंद करु शकता का? बंद करा - रवीश कुमार
X

जर तुम्हाला असं वाटतं की, तुम्ही तुमची नागरिकता वाचवणं गरजेचं आहे. तर तुम्ही चॅनेल्स पाहणं बंद करा. जर तुम्ही लोकशाहीमध्ये एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडू इच्छिता तर तुम्ही चॅनेल पाहणं बंद करा. जर तुम्ही तुमच्या मुलांना सांप्रदायीकतेपासून वाचवू इच्छिता तर चॅनेल पाहणं बंद करा. जर भारतातील पत्रकारीता वाचवणं ही जर तुमची इच्छा असेल तर आपण चॅनेल पाहणं बंद करा. न्यूज चॅनेल पाहणं स्वत:ची हानी होताना पाहण्यासारखं आहे. मी आपल्याला विनंती करतो की, आपण कोणतंही चॅनेल पाहू नये. टीव्हीवरही पाहू नका किंवा मोबाइलवरही. आपल्य़ा रोजच्या जीवन क्रमातून न्यूज चॅनेल बघणं सोडून द्या. मला ही पाहणं बंद करा. पण सर्व न्यूज चॅनेल पाहणं बंद करा.

मी ही बाब पहिल्यांदा देखील बोललो आहे. मी हे जाणतो की आपण इतक्या लवकर या मुर्खपणाच्या नशेतून बाहेर येणार नाही. मात्र, पुन्हा एकदा विनंती करतो की, हे अडीच महिने चॅनेल पाहणं बंद करा. जे काही तुम्ही सध्या चॅनेलवर पाहात आहात ते वेडं जग आहे. ते एक उन्माद करणार जग आहे. त्यांची ही आता सवय झाली आहे. तसं हे पहिल्यादांच होत नाही. जेव्हा पाकिस्तानबरोबर तणाव नसतो. तेव्हा हे चॅनेलवाले मंदीराच्या विषयावर तणाव निर्माण करतात. जेव्हा मंदीराचा प्रश्न नसतो तेव्हा हे चॅनेलवाले पद्मावती चित्रपटावरुन तणाव निर्माण करतात. जेव्हा चित्रपटावरुन तणाव नसतो. तेव्हा हे चॅनेलवाले कैराना येथील निवडणुकीनंतर हिंदू मुसलमान दरम्यान तणाव निर्माण करतात. आणि जेव्हा काहीच नसतं तेव्हा हे खोट्या सर्व्हेवर तासं-तास कार्यक्रम करतात. ज्याचा काहीच अर्थ नसतो.

तुम्ही हे समजू शकता का? हे का होत आहे. काय आपण एक नागरिक म्हणून हे चॅनेल पाहताना नागरिकांना पाहतात का? या चॅनेलनी लोकांना काढून टाकलं आहे. त्यांना लोटून दिलं आहे. लोकांचे प्रश्न नाही. चॅनेलचे प्रश्न लोकांचे प्रश्न बनवले जात आहे. ही इतकी छोटी बाब नाही की, तुम्ही ते समजू शकत नाही. लोक त्रासामध्ये आहेत. ते चॅनेल चॅनेल फिरुन पुन्हा तिथंच येतात. मात्र, त्यांना त्यांची जागा, त्यांच्या समस्या मिळत नाही. तरुणांच्या प्रश्नांसाठी त्यांच्याकडे जागा नसते. मात्र, चॅनेल त्यांना पकडून मूर्ख बनवत आहेत. चॅनलला हे प्रश्व कुठून य़ेतात… हे आपल्याला माहिती असायला हवं. हे चॅनल आता जेव्हा काही करतात. त्याच तणावासाठी करतात. जो तणाव एका नेत्यासाठी रस्ता तयार करतो. त्या नेत्याचं नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी.

न्यूज चॅनेल, सरकार, भाजप आणि मोदी यांचं एकत्रीकरण झाले आहे. हे एकत्रीकरण इतकं चांगलं आहे की, पत्रकारीता आहे की, प्रचार (प्रोपेगैंडा) आहे. आपण एका नेत्याला पंसद करतात. हे स्वभावीक आहे आणि काही अंशी ते गरजेचं पण आहे. त्या पसंतीचा वापर करुन चॅनेल द्वारा जे केलं जातं आहे, ते अत्यंत भयंकर आहे. भाजपच्या जबाबदार समर्थकांना खऱ्या सुचनांची गरज असते. सरकार आणि मोदींची भक्ती यामध्ये त्या भाजप समर्थकांना प्रोपोगंडा देणं हे त्या सर्थकांचा अपमान आहे. त्याला मूर्ख समजवलं मात्र, तो त्याच्या समोर असलेल्या सुचनांच्या आधारे कोणाचे तरी समर्थन करत असतो. आजच्या न्यूज चॅनेलनी फक्त सामान्य नागरिकांचा अपमान केला नाही तर, त्यांच्या सोबत भाजप समर्थकांचा देखील अपमान केला आहे.

मी भाजप समर्थकांना देखील विनंती करतो की, तुम्ही देखील हे चॅनेल पाहू नयेत. आपण भारताच्या लोकशाहीच्या नुकसानास कारणीभूत ठरु नयेत. काय आपण या चॅनेलच्या शिवाय नरेंद्र मोदी यांचे समर्थन करु शकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनासाठी घसरलेल्या पत्रकारितेचं समर्थन करणं गरजेचं आहे काय? तर तुम्ही एक ईमानदार राजनैतिक समर्थक नाहीत. पत्रकारीतेच्या मुल्यांचा वापर करुन आपण नरेंद्र मोदींचे समर्थन करु शकत नाही का? किंवा हे अशक्य झालं आहे? भाजप समर्थकांनो तुम्ही या भाजपला स्विकारलं होतं. या चॅनेलला नाही. घसरलेली पत्रकारीता हे राजकारण आणि त्यांच्या समर्थकांना देखील घसरणार आहे.

चॅनेल आपल्या नागरिकतेवर हल्ला करत आहेत. लोकशाहीत नागरिक हवेमध्ये घडत नाहीत. खऱ्या सुचना आणि खरे प्रश्न आपल्या नागरिकतेसाठी गरजेचे आहेत. या चॅनेलकडे हे दोनही नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व गोष्टीचे पालक आहेत. संरक्षक आहेत. त्यांच्या भक्तीने चॅनेलने स्वत:ला ‘भांड' बनवलं आहे. ते पहिलेच ‘भांड' होते. मात्र, आता ते तुम्हाला ‘भांड' बनवत आहेत. आणि तुमचं ‘भांड' होणं लोकशाहीसाठी घातक आहे.

भारत पाकिस्तानच्या तणावामुळे यांना राष्ट्रभक्त होण्याची संधी मिळाली आहे. यांच्याजवळ राष्ट्रा प्रती कोणतेच प्रेम नाही. प्रेम असते तर लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ असलेल्या पत्रकारीतेच्या मानांकनांना यांनी गाढलं नसतं. चॅनेलवर ज्या पद्धतीने भारताला दाखवलं जात आहे. ज्या पद्धतीचा भारत आपल्या गळी उतरवला जात आहे. तो आपला भारत नाही. देश प्रेमाचा अर्थ असा होतो की, आपण सर्वांनी आपलं काम उच्च आदर्श आणि उच्च मानकांच्या हिशोबाने करायला हवेत. हिम्मत तर बघा ना… खोट्या सुचना आणि अनाप - शनाप घोषणाबाजीने आणि विश्लेषणांनी अशी देशभक्ती आपल्यामध्ये उतरवली जात आहे. आपल्या आतील प्राकृतिक चॅनेलला नष्ठ करुन न्यूज चॅनेल आपल्या मध्ये देशभक्तीचं प्राकृतिक चॅनेल उभा करत आहे. की ज्यामुळे आपण फक्त एक रोबोट बनलं पाहिजे.

या वेळची वर्तमानपत्र आणि चॅनेल आपली नागरिकता आणि आपले नागरी अधिकार यांच्या समाप्तीची घोषणा करत आहेत. आपल्याला टीव्ही समोर बसल्यानंतर हे समजायला हवं की हे चॅनल आपले अधिकार संपवत आहेत किंबहुना तसं त्यांनी केलं आहे. वृत्तपत्रांची देखील हीच परिस्थिीती आहे. हिंदीच्या वृत्तपत्रांनी तर वाचकांच्या हत्येची सुपारीच घेतली आहे. खोट्या आणि सशक्त नसलेल्या सुचनांच्या आधारावर वाचकांची हत्याच होत असते. त्यामुळे वृत्तपत्राची पान देखील लक्षपुर्वक पाहा. हिंदी वृत्तपत्रांना घरातून लांब फेकून द्या. एक दिवस अलार्म लावून झाेपी जा. आणि उठून वृत्तपत्र टाकणाऱ्याला सांगा… दादा वृत्तपत्र निवडणुकीनंतर टाका...

या सरकारची इच्छा नाही की, आपल्या नागरिकांना खरी माहिती - सुचना मिळवून ते सक्षम नागरिक बनतील. आपल्यामध्ये जर सरकारचा विरोधी पक्ष तयार होत नसेल तर, आपल्या आत सरकारचा समर्थक देखील तयार होऊ शकत नाही. शुद्धीवर असताना सपोर्ट करणं आणि नशेचे इंजेक्शन देऊन सपोर्ट करणं दोनं वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहिल्यामध्ये आपल्या स्वाभिमान झळकतो तर दुसऱ्यात अपमान! काय आपण अपमानीत होऊन हे न्यूज चॅनेल पाहू इच्छिता. याच्याद्वारे सरकारला समर्थन देऊ इच्छिता.

मी जानतो की, माझा हा लेख करोडो लोकांपर्यंत पोहोचेल आणि करोडो लोक न्यूज चॅनेल पाहणं सोडतील. मात्र, मी तुम्हाला सुचित करु इच्छितो की, जर हीच चॅनेलची पत्रकारीता आहे. तर भारताच्या लोकशाहीचे भविष्य सुंदर नाही. न्यूज चॅनेल एक असा समाज निर्माण करत आहे. जो खोट्या सुचनांच्या आणि अपुऱ्या माहितीच्या अाधारावर आहे. हे चॅनेल पाहून तयार झालेला हा समाज त्या समाजाला हरवून टाकेल. ज्यांना माहितीची गरज आहे. ज्यांच्याजवळ प्रश्न आहेत. प्रश्न आणि सुचनांशिवाय लोकशाही नसते. लोकशाहीत नागरिक होत नाही.

सत्य आणि तथ्थ्यामधील प्रत्येक संभावना संपवली गेली आहे. मी प्रत्येक दिवशी नागरिकांना लोटलेलं पाहतो. ही चॅनेल अशा ठिकाणी नागरिकांना लोटतात… जिथं राजनिती आपलं बंवडर रचत आहे. राजकीय पक्षांच्या व्यतीरिक्त बाहेरच्या प्रश्नांची जागा शिल्लक राहिलेली नाही. न जानं किती प्रश्न आपली वाट पाहात आहे. चॅनेलने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना लोकांच्या विरोधात उभं केलं आहे. तुमच्या पराभवाची घोषणा ही चॅनेल आहेत. तुमची गुलामगिरी हेच त्यांच जिंकणं आहे. यांच्या प्रभावातून कोणीही इतक्या सहजा सहजी निघू शकत नाही. आपण एक दर्शक आहात. आपण एका नेत्याचे समर्थन करण्यासाठी पत्रकारीतेचे नुकसान करु नका. फक्त अडीच महिन्यांची बाब आहे. चॅनेल पाहणं बंद करा.

Updated : 2 March 2019 2:40 PM GMT
Next Story
Share it
Top